कोणताही राजकीय वसा आणि वारसा
नसताना सुद्धा स्वतःच्या कर्तृत्वाने राजकिय जीवनात वाटचाल
करताना पहिल्यांदा २००९ भा.ज.यु.मो. शहर सरचिटणीस म्हणून निवड
झाली. सामाजिक बांधिलकी मानून सामाजिक ऋण फेडण्यासाठी आणि
समाजासाठी काहीतरी केले पाहिजे असे सामाजिक वास्तवता
पाहिल्यानंतर आपण समाजासाठी काय करू शकु ? असा प्रश्न समोर
काहीतरी सांगतोय याची जाणीव झाल्याने महाविद्यालयीन विद्यार्थी
दशेत २००१ ते २००६ पर्यंत प्रतिष्ठाण महाविद्यालयात शिक्षण
घेणाऱ्या तळागाळातील गरजवंत विद्यार्थ्यांना राहण्यासाठी
वसतीगृह उपलब्ध करून दिले. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची
पूर्ण रक्कम मिळत नसल्याने त्यांना शिष्यवृत्तीची पूर्ण रक्कम
मिळावी म्हणून कॉलेज व्यवस्थापनाशी संघर्ष करून
विद्यार्थ्यांचे चेक बँक खात्यावर शिष्यवृत्ती देण्याचा लाभ
विध्यार्थ्यांना मिळवून दिला.
अन्नदान उपक्रमातून गरजूंना मदत करत सामाजिक बांधिलकी जपत सातत्याने सेवा कार्य करताना.
विद्यार्थ्यांना वह्या आणि कंपास वाटप करून त्यांच्या शिक्षणासाठी सातत्याने मदत करताना.
आंबेडकर जयंती निमित्त सामाजिक उपक्रम राबवून समता, शिक्षण आणि बंधुता यांचे मूल्य जपण्याचा प्रयत्न करताना.
विद्यार्थ्यांना वह्या वाटप करून त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देत सामाजिक बांधिलकी जपत सातत्याने सेवा कार्य करताना.
नागरिकांना मतदानाचे महत्त्व समजावून सहभागी होण्यासाठी जागरूकता उपक्रम राबवताना.
सामाजिक प्रश्नांसाठी शांततापूर्ण आंदोलनांत सहभागी होऊन जनजागृती आणि सार्वजनिक हितासाठी आवाज उठवताना.